Saturday, 23 July 2011

prawahi


प्रिय,
नदी पाहिलीएस कधी ?
किनारे कोणते होते तेव्हा ?
नदी – नदीच होती की होती तुझ्या विचारांचं प्रतिबिंब ?
कधी स्वच्छंद खळाळती, कधी गहन शांत ...
तिऱ्हाईत म्हणून पाहिलस् कधी पाण्याकडे ? – साऱ्या शहराची मनोवस्था पाण्यावर उमटलेली...तरंगणारी.
नदी व्हावं वाटत म्हणणारे किती महाभाग भेटले असतील...प्रत्येकाची भावना वेगळी पण नदी होण् जमेल त्यांना ?
वर वर खळाळत राहण आणि आतून शांत, संयत वाहत राहणारे तिचे अणु रेणू पेलता येतील ?
किनाऱ्याना किनाऱ्याशीच थोपवण जमल पाहिजे ना...
वाहत्या प्रवाहांच आकर्षण कुठून येत मनात ? आपण ‘वाहत’ व्हावं अस का वाटाव ?
शरीरभर वाहत्या संवेदना शरीर हलक करू पाहतात की अजून काही ?
इतक सोप आहे हे ?
आयुष्य थांबल्यासारख वाटण वेदनामयचं...वाहत्या उर्जा जिवंत ठेवत असाव्यात आपल्याला बहुधा ...
वाह्तेपण प्रवाहाच ...
प्रवाहाविरुद्ध पोहण अवघड आणि प्रवाह वाहते करण त्याहून अवघड ...
वाह्तेपण हवं सहज...सजग...ताकद समेटणार आणि पारदर्शी .................... कायमचं !